Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

मुस्लिमांनो, जरा विचार कराल..?

मी तुम्हाला बहुसंख्य हिंदू असे दाखवतो जे आपल्या धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, मागासलेले विचार सरळसरळ नाकारतात आणि त्याविरुध्द खुले आम चर्चा करतात किंवा समाज प्रबोधन करतात…. पण असे किती मुस्लिम बांधव दाखवता येतील ज्यांनी आपल्या धर्मातील अनिष्ट रूढी परंपरेला सार्वजनिक विरोध केलाय किंवा कशाचीच पर्वा न करता मुलतत्ववाद्यांच्या विरोधात मोहीम उघडलीय (हमीद दलवाई सारखी)…

किती मुस्लीम बांधवांनी बुरखा पद्धतीला विरोध केला?? किती मुस्लीम बांधवानी स्त्री समानता पूर्णपणे पाळली, किंवा त्यांच्या हक्कासाठी आग्रही राहिले..? किती मुस्लीम बांधवानी धर्माच्या नावावर प्राण्याच्या कत्तली थांबवल्या, दिले जाणारे बळी थांबवले? किती जणांनी बहुपत्नीत्व किंवा तलाक पद्धती बद्दल आवाज उठवला..? निदान जाहीर निषेध तरी व्यक्त केलाय?? वैयक्तिक आयुष्यात या गोष्टी “न मानणं” वेगळं, पण त्यासाठी मोठी चळवळ उभा करणं साधं काम नाही.

याउलट हिंदू बांधव परिवर्तनाला प्रतिसाद देत आहेत.. विरोध होत नाही असं नाही, पण तितक्याच प्रमाणात सपोर्ट देखील मिळत आहे… दाभोळकर हत्या प्रकरणात (पुरावे नसताना सुद्धा) कट्टर हिंदुत्ववाद्यांना झोडपणारे पुरोगामी हिंदूच होते..
हिंदू धर्मातल्या अनिष्ठ चालीरिती आणि परंपरांविरोधात भरीव कामगिरी केलेल्या सुधारणावाद्याची एक मोठी लिस्टच देता येईल, राजा राम मोहन रोय पासून दाभोळकरांपर्यंत… पण मुस्लिम समाजात मात्र हाताच्या बोटावर मोजता येण्या इतपतच..!!

माझी मुस्लीम बंधू-भगिनींना एकच विनंती आहे – प्रत्येक गोष्ट धर्मातून बघू नका… किंवा कुणीतरी शिकवतोय म्हणून ऐकू नका. ज्या गोष्टी संविधानबाह्य आहेत, ज्या गोष्टी, प्रथा, परंपरा, रूढी किंवा विचारसरणी ‘मानवता धर्मा”च्या विरुद्ध आहे त्या आपण सोडायला नको काय?? परिस्थिती बदलत आहे, जगण्याचे आयाम बदलत आहेत. धर्माला आधुनिकतेची जोड द्यावी मित्रानो… मी धर्म सोडा असं बोलत नाही.. फक्त धर्माला आधुनिक युगाची कास द्यावी इतकेच माझे सांगणे आहे..

समाज हा शिक्षणाने सुधारतो. काळाची पावले ओळखत योग्य-अयोग्य गोष्टी (कार्य-कारणभाव) तपासून, योग्य ते बदल अंगिकारल्यानेच प्रगती साधता येते.

  • मुघल सम्राट, निजाम, बादशहा आणि सुलतानां पासून शेकडो वर्ष ‘राज्यकर्ते’ असलेला हा समाज आज या परिस्थितीत का आला असावा याचा विचार कधी केलाय का मुस्लिम समाजाने..?
  • आधुनिक शिक्षणाची गंगा मुस्लिम वस्त्यात पोहचू दिलीय काय..?
  • शिक्षणासाठी मदरशांच्या पलीकडे जाउन आपण विचार करणार आहोत का..?
  • प्रशासनात किती मुस्लिम आहेत…?
  • सारे जग मुस्लिमांकडेच संशयाने का पहात असावे…?
  • पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांच्या विरोधात आपण निषेधाचे किती मोर्चे काढले आहेत..?
  • अमेरिकेच्या कोणत्यातरी राज्यात कोणतातरी ख्रिश्चन धर्मगुरू इस्लाम विरोधात काहीतरी बोलला तर आख्खं सोलापूर शहर आपण बंद पाडलं तर मग ओवेसी किंवा बुखारी बरळतो तेव्हा आपण किमान फेसबुक वरून तरी संघटीत निषेध केला का..?
  • कसाब किंवा अफजल गुरूला लवकर फाशी द्यावी, असल्या दहशतवाद्यांमुळे आमची पूरी कौम बदनाम होतेय म्हणून आपल्यातले किती जण आमरण उपोषणाला बसले..?
  • आपण आपल्या देशनिष्ठेला संशयास्पद स्थितीत ठेवतो आहोत का..?
  • धर्म भावनांच्या पलीकडे जाऊन चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायची धमक आपण दाखवणार आहोत का..?
  • संगीत गैरइस्लामी आहे, जीन्स टी शर्ट इस्लामच्या विरुध्द आहे, कोका कोला मुस्लिमांच्या विरुद्ध आहे, बुरखा घातलाच पाहिजे, असल्या फालतू फतव्यांना बळी पडणं आपण सोडणार आहोत का..?
  • “इस्लाम खतरे में”.. असं म्हणून जर कोणी भडकवत असेल, तर आपण त्याचं वेळीच तोंड बंद करणार आहोत का..?

या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मुस्लिमांनी स्वतःला विचारून बघावीत..

माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी कुठलाही धर्म, रूढी, परंपरा यांचा अडसर येऊ नये. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या धर्माचे धर्मपरीक्षण करावे व हा भारत देश धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र व्हावे यासाठी हातभार लावावा.
या जगताला धर्मनिरपेक्ष मानवतावादच पुढे नेऊ शकेल.

देशाच्या हितासाठी व काळाला उचित असणारे परिवर्तन(Reform) जो धर्म नाकारतो, तो कालबाह्य आणि म्हणून तितकाच कट्टर बनत जातो हे लक्षात ठेवावे…

  • डॉ सचिन लांडगे
मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *