मी जेव्हा मोदी सरकारवर टीका करतो तेंव्हा काही लोक श्वानासारखे वसकन अंगावर येतात.. बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो पण कधी कधी त्या दुर्लक्षाचा अर्थ ते एकतर आपला नेभळटपणा किंवा त्यांचा विजय वगैरे समजून स्वतःतच खुश होतात.. आणि आजूबाजूचे चार चिअर लिडर्स जमा करून स्युडो आत्मसमाधान मिळवतात..
असो.. मिळवोत बापडे..
अहो, सरकार फक्त एक सेवा पुरवणारी व्यवस्था आहे.. जसं फेसबुक आहे, जिओ, आयडिया, एअरटेल आहे, मॅकडोनाल्ड आहे.. अगदी तसं..
उद्या कोणी झुकेरबर्गवर टीका केली किंवा रिलायन्सच्या पॉलिसीज वर टीका केली, किंवा समजा पिझ्झाला नावे ठेवली तर पिझ्झा समर्थक लोक चिडतील का ?
मग सरकारशी असे भावनात्मक संबंध का बनवतात लोक ?
जनता सरकारला निवडून देत असते.. एकदा तुम्ही मतदान केलं की तुमची भूमिका संपली..
सरकारवर टीका करणे, आपल्या मागण्या मांडणे, त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे हे जनतेचे काम व संविधानिक अधिकार आहे…
त्याचा कोणाला राग का यावा ?
सरकारतर्फे टीकेला उत्तर देण्याचे वकीलपत्र घेतल्यासारखे का करतात लोक..?
सांगायची गोष्ट अशी आहे की, आपण निवडून दिलेलं सरकार हे फक्त तुमचं किंवा माझं नसतं.. ते देशाचं सरकार असतं.. त्यांच्या प्रत्येक बऱ्यावाईट निर्णयावर तुमचं माझं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य अवलंबून असतं.. आणि सरकारवर टीका टिपण्णी करण्याचा मला तेवढाच हक्क आहे जेवढा तुम्हाला आहे..
कोणी सरकारवर टीका केली तर तुमच्यापुढे तीन पर्याय आहेत..
- केलेली टीका कशी निराधार आहे हे संदर्भ देऊन खोडून काढा..
- सरकारच्या चांगल्या कामांची आणि योजनांची माहिती पसरवा..
- किंवा सरळ त्या व्यक्तीला आणि टीकेला इग्नोर करा..
मोदींना किंवा कोणत्याही नेत्याला बोलल्यावर तुमच्या पिताश्रींनाच बोलल्यासारखे तुम्ही मनाला लावून घेत असाल, तर तो तुमच्या मानसिकतेचा प्रश्न आहे..
यु शुड कन्सल्ट अ सायकीयाट्रीस्ट..
सिरियसली..!!