20 वर्षे परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काल एका स्त्रीने आपल्या सशक्त कायद्याचा आधार घेत बलात्कार आणि फसवणुकीचा खटला दाखल केला आहे..
आरोपी केवळ भाजपाचा आहे म्हणून बऱ्याच जणांनी तत्काळ तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे..
परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवल्यास तो “बलात्कार” कसा काय होऊ शकतो?
अलीकडच्या काळात (सामाजिक दृष्टिकोनातून) ‘सेक्स’च्या नियमांमध्ये खूप बदल झाला आहे. ‘टॅबू’ नावाचा प्रकार आता उरलेला नाही. ‘सेक्स’बाबत असलेले आचार-विचार खूप लिबरल झाले आहेत. सेक्ससाठी लग्नापर्यंत थांबणे ही भूतकाळातील गोष्ट बनली आहे..
अशा परिस्थितीत काही दिवस लग्न न करता एकत्र राहून नंतर बलात्काराची तक्रार करायची याला काय अर्थ आहे?
*त्यात आता कोर्टाने लिव्ह्-इन’ रिलेशनशिपना मान्यता दिली आहे. त्या संदर्भात या जुन्या कायद्याला काय अर्थ आहे?* दुसरा मुद्दा फसवणुक करण्याचा.. लग्नाचे आमिष दाखवले म्हणजे काय? चार-पाच वर्षाच्या मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवता येते कारण तो सज्ञान नसतो. सज्ञान स्त्रीला लग्नाचे आमिष दाखवले म्हणजे काय? (समजा स्त्रीने लग्नाला नकार दिला तर पुरूष बलात्काराचा आरोप दाखल करू शकतो का?) ..आणि दुसरं, तुम्हाला तो फसवतो आहे, हे कळायला काही वर्ष लागत असतील तर तुमच्यासारखी माठ तुम्हीच.. अलीकडच्या काळात खूप मुलंमुली लग्नाआधी परस्पर सहमतीने शरीरसंबंध ठेवताहेत. बऱ्याच वेळा लग्नाबद्दल त्यांच्यात काहीच ठरलेलं नसतं.. त्यांना सुरुवातीला फक्त 'फिजिकल रिलेशन' हवे असतात.. मग त्यांच्यात काही अश्लील मेसेजेसची देवाणघेवाण होते, एकत्र फोटो काढले जातात, काही काळ एकत्र घालवला की intimate क्षणांचे व्हिडीओ पण काढले जातात.. मग त्या मुलीला कालांतराने समजा वाटलं, की लग्न करण्यासाठी हाच 'बकरा' योग्य आहे, किंवा कालांतराने त्यांचे संबंध जगजाहीर झाले, आणि ती मुलगी त्याला समाजलज्जेस्तव लग्नासाठी फोर्स करायला लागली, तर मग त्या मुलाने काय करायचे?.. मग ती स्त्रीच्या बाजूने असलेल्या कायद्यांचा आधार घेत, 'बलात्काराची केस करेन' म्हणत पुरुषाचे ब्लॅकमेलिंग पण करू शकते.. (अशा प्रकरणात मुलंच जास्त करून मुलींचं ब्लॅकमेलिंग करतात हे मला नजरंदाज करायचं नाहीये, पण दुसरी बाजूही आपल्याला इथून पुढे सिरियसली विचारात घ्यावी लागेल, हे विसरूनही चालणार नाहीये..) दोघांत शारीरिक संबंध असतील तर केवळ त्या मुलालाच कंड असेल म्हणून त्याने हे केलं, किंवा फक्त त्यालाच मजा घ्यायची असेल म्हणून त्याने मुलीला जाळ्यात ओढलं असणार, अशी आपली पारंपरिक समजूत आहे, ती पहिल्यांदा आपल्याला बदलावी लागेल.. अलीकडं खूप मुलींना "बिनधास्त लाइफस्टाइल" अनुभवायची असते, बियर प्यायची असते, पब मध्ये जायचं असतं, मॅकडी सीसीडी आणि हॉटेलिंग त्यांना खुणावत असतं, नाईटआऊट मुव्ही ट्रिप हे सारं हवं असतं.. पण घरून पैसे कमी मिळत असतात, किंवा सोबत (संरक्षण) हवी असते, म्हणून त्या एक बॉयफ्रेंड 'पाळतात'.. पिअर ग्रुप्समुळं 'बॉयफ्रेंड असणं' यालाही एक प्रेस्टीज असते.. त्यांच्यात "फक्त एन्जॉयमेन्ट" हाच एक मोटिव्ह असतो.. कधी कधी लग्नाबद्दल अगदी वरवरचं आणि मोघम बोलणं झालेलं असतं.. पण मग कालांतराने ती मुलगी भावनिक व्हायला लागते.. आणि (मग ती स्त्रीच्या बाजूने असलेल्या कायद्यांचा आधार घेत, 'बलात्काराची केस करेन' म्हणत) त्या मुलाचे ब्लॅकमेलिंग करू लागते.. बऱ्याचदा, केवळ थ्रिल म्हणून (किंवा स्वतःची शारीरिक गरज म्हणून) मुली या फिजिकल रिलेशनना मान्यता देतात, पण नंतर त्यांना या संबंधांत आपल्याला 'खूप काही' मिळू शकतं याची जाणीव होते.. यात तिला भरीस घालणारे पण बरेच असतात.. मग पद्धतशीरपणे पुरुषाला ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात.. आणि या प्रकरणांचं प्रमाण आपण विश्वास ठेवू शकणार नाही इतकं मोठं आहे.. आपल्या शारीरिक गरजेसाठी किंवा गरजेपुरतंच पुरुषांच्या भावनांशी खेळणाऱ्या पण काही कमी नाहीत.. एखादं चांगलं स्थळ आलं, किंवा एखादा अजून चांगला मोठा पैसेवाला बॉयफ्रेंड मिळाला तर आपल्या प्रियकराच्या आपल्यात असलेल्या भावनिक गुंतवणुकीचा जराही विचार न करता त्याला सोडून दुसरा पकडणाऱ्या देखील मुली आहेत.. मनुष्य स्वभावाचे सगळे दुर्गुण जसे पुरुषात असतात तसे ते स्त्रियांत देखील असतात. दरवेळेस स्त्री ही अबला नारीच असते, आणि पुरुष हा टपून बसलेला पशु च असतो असं नाही.. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी सॉफ्ट फ्लर्टिंग करत (किंवा समोरच्याच्या सॉफ्ट फ्लर्टिंगला बऱ्यापैकी रिस्पॉन्सीव्ह राहत) कितीतरी स्त्रिया छोटेमोठे प्रिव्हिलेजेस घेत असतात, कार्यभाग साधून घेत असतात किंवा डायरेक्ट इन-डायरेक्ट फायदे उकळत असतात.. पण ऐनवेळी मात्र पद्धतशीरपणे व्हिक्टीम कार्ड खेळतात.. आणि या प्रकरणांचं प्रमाण आपण विश्वास ठेवू शकणार नाही इतकं मोठं आहे.. (मी पुन्हा सांगतोय, यात पुरुष 'दूध के धुले' असतात असं अजिबात नाही, पण पुरुषच तशी परिस्थिती निर्माण करतात, आणि स्त्री ही नेहमी 'अबला नारी' असते, असंही नाही!!) सुट्टी पाहिजे असेल तर मुद्दाम तोकडे कपडे घालून येणं, बोलताना आवाज नको तितका मधाळ करणं, गरज नसताना समोर वाकणं, असे टॅक्टिक्स वापरले जातात की जे otherwise objectionable नसतात.. 'सर, आज खूप थकलेले दिसत होता तुम्ही' , 'सर नाराज आहात का?, माझं काय चुकतंय ते तरी सांगा', असं म्हणत चॅटिंग ची सुरुवात केली जाते, आणि त्यातले काही मेसेजेस डिलीट करून ठराविक मेसेज असलेले स्क्रीनशॉट काढून ते बदनामीसाठी वापरले जातात.. एखाद्याने निव्वळ मैत्री भावनेतून किंवा केअरिंग मधून जरी एखाद्या स्त्रीला मेसेज केले, बोलला तरी , तो 'तसलाच' असं गृहीत धरून त्याचे स्क्रीनशॉट काढून जाहीर बदनामी केली जाते किंवा मित्रवर्तुळात मजा तरी घेतली जाते.. स्वतः काहीतरी indicative वागायचं बोलायचं करायचं, आणि समोरच्याने तो धागा पकडून काही बोलला केले, तर मग 'अन्यायग्रस्त अबला नारी' असल्यासारखं सिपंथी मिळवायची, किंवा व्हिक्टीम कार्ड खेळायचं, असं देखील केलं जातं.. असो.. अशा परिस्थितीत त्याच त्या जुन्यापाण्या कायद्यांच्या आधारावर आपण कुठवर "न्याय" करत राहणार आहोत? कुठल्या जमान्यात जगत आहोत आपण? एकीकडे
लिव्ह्-इन’ रिलेशनशिपना मान्यता द्यायची आणि दुसरीकडे प्रत्येक विवाहपूर्व संबंधांना ‘बलात्कार’ किंवा ‘फसवणूक’ म्हणायचं, याला काय अर्थ आहे?
सगळ्याच विवाहपूर्व संबंधांना ‘गुन्हा’ ठरवलं तर इथले बरेच लोक जेल मध्ये चक्की पिसायला जातील.. बदलत्या काळानुसार आपल्या समजुती दोन्हीही आपण बदलायला हव्यात.. याबद्दल मोकळेपणाने चर्चा व्हायला हव्यात, या गोष्टींकडे धार्मिक किंवा पारंपरिक चष्म्यातून बघण्याऐवजी बदलत्या काळाची पावले वेळीच ओळखून शहाणे व्हायला हवे..
टीप – १. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतोय, बलात्कार आणि लैंगिक शोषणाला खूप मुली आणि स्त्रिया हकनाक बळी पडतात, हे खूप दुर्दैवी आहे.. आणि तो खूप मोठा विषय आहे, पण त्यामुळे बदलत्या काळातील फिजिकल रिलेशनच्या नवीन ट्रेन्डस् कडे आपण डोळेझाक करू शकत नाही.. या दुसऱ्या बाजूचाही तितक्याच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, एवढेच मी अधोरेखित करू इच्छितो..
२. अशा विषयांवर मोकळेपणाने मुलांनी आणि मुलींनी दोघांनाही व्यक्त झाले पाहिजे.. आपली याबाबतीतली मतं इतरांना समजली तर आपल्याबाबत बाकीचे काय विचार करतील, हा विचारच समाजाच्या एकंदरीत प्रगतीला मारक ठरत असतो..