मांसाहार करणं अजिबात वाईट नाही.. पण देवाधर्माच्या नावाखाली बळी किंवा कुर्बानी देणं हे वाईट आहे..
खरंतर, कुराणात सांगितलेय म्हणून पशुहत्या करायची काहीच गरज नाही..
बरं, कुराण पाळायचंयच् ना? मग कुराणातल्या प्रमाणे “किसी अपने”की कुर्बानी द्या बरं..!! बाजार से 2 बकरे खरीदकर काट देने से तुम्हारी दुआ कैसे कबूल होगी!!
देवासाठी बोकड/कोंबडा बळी देण्याची जत्रेतली प्रथा जशी मला मंजूर नाही तसे बकरी ईदच्या निमित्ताने अल्लाहला बोकडाची कुर्बानी द्यायचा प्रकार मला अजिबात मंजूर नाही, आणि याचा सरळ सरळ विरोध आपल्यासहित सर्वच् समाजाने करायला हवा..
अंनिस’नेच् अश्या अनिष्ट गोष्टींना विरोध करावा असा हक्क वगैरे काही त्यांनी घेतलेला नाही.. किंवा तो फक्त त्यांचाच प्रांत आहे असे पेटंटही त्यांना कोणी दिलेले नाही..
खरंतर, सुधारणांचा वसा साऱ्या समाजानेच घ्यायला हवा..
पण या मुद्द्याला “ते आणि आम्ही” असा उगीच धार्मिक चढाओढीचा रंग देणे, किंवा ‘इको फ्रेंडली’ सारखी फसवी लेबलं लावणे, हे आपल्यातल्या धर्मांधतेचे लक्षण आहे.. मग आपलेही ‘तालिबानीकरण’ व्हायला वेळ लागणार नाही…