भुरटा चोर असो, दरोडेखोर असो, बलात्कारी असो किंवा दहशतवादी असो.. जोपर्यंत त्यांच्या कृत्यांना समाजातून नैतिक पाठबळ मिळत असतं, तोपर्यंत त्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत नसते.. ती वाल्या कोळ्याची गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेलच.. कोणती गोष्ट त्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते ते आपल्याला माहितीये.. सध्याच्या समाजातही तसंच होतंय..
दहशतवादी कारवायांच्या निषेधाचे सूर मुस्लिम समाजात इतके अल्पमतात आहेत की त्यांचा आवाज क्षीण पडतो.. हिंदू समाजात दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश प्रकरणात जसं तुटून पडलं जातं, तसा जोश आणि संख्याबळ मुस्लिमांच्यात नसतं.. ‘सेव्ह गाझा’ चा आवाज जितका दुमदुमतो तितका ‘बॅन तालिबान’ किंवा ‘बॅन इसीस’चा आवाज अजिबातच नसतो..
दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या गोष्टी समाजात तीन पातळींवर होत असतात –
१. कुराणातल्या आयतींचे मुल्ला मौलवींनी लावलेले अर्थ आणि त्यांची कडवी धार्मिक शिकवणूक दहशतवाद्यांना हिंसेची प्रेरणा देतात..
२. त्यांच्या समाजातले झाकीर नाईक सारखे बुद्धिभेद करणारे स्युडोबुद्धिवादी लोक जे लोकांच्या मनाची मशागत करून कडव्या धार्मिक विचारांचं पीक येण्यासाठी मदत करतात..
३. त्यांच्या समाजातले लोक जे ‘फक्र हैं’ म्हणत दहशतवाद्यांची भलामण करतात, प्रसंगी देणग्याही देतात, अथवा बहुसंख्य लोक जे अशावेळी सोयीस्कर मौन धारण करतात..
या तीनही स्तरांवरचे लोक ‘छुपे दहशतवादी’ असतात.. यांच्या हातात बंदुका नसतात फक्त, पण डोकी ही पूर्ण बॉम्बनी भरलेली असतात..
पण जोपर्यंत “आपण ज्या धर्माच्या रक्षणासाठी आतंक माजवतोय, काफ़िरांचे प्राण घेतोय, त्या माझ्या धर्मबांधवांना त्याचं काहीच पडलेलं नाहीये, उलट माझ्या कृत्यांबद्दल माझाच समाज माझी हेटाळणी करतोय”, हे चित्र जोपर्यंत स्पष्ट/अतिस्पष्ट उभं रहात नाही, तोपर्यंत दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटणार नाही..
आज साऱ्या जगाने इस्लामी दहशतवादाविरुद्ध छुपे युद्ध पुकारले आहे. प्रत्येक ठिकाणी यांच्याकडे संशयित म्हणूनच पाहिले जात आहे, मग ते विमानतळ असो किंवा साधं घर भाड्यानं द्यायचं असो.. हे थैमान असंच चालू राहिलं तर एक दिवस हे युद्ध प्रत्येक देशातल्या गल्लीगल्लीत लढलं जाईल..
‘ते तसं करताहेत तर आपणही संघटित झालं पाहिजे’ असा डाव टाकून आम्हाला मतं द्या म्हणणारे टपून बसलेले आहेत, त्याआधीच ‘हे असं का होतंय?’ याचा विचार प्रत्येक मुस्लिमाला करायची गरज आहे..
आज श्रीलंका आहे, काल फ्रांस ऑस्ट्रेलिया होतं.. उद्या सारं जग असेल..
अगर आज ख़ामोश रहे, तो कल सन्नाटा छा जाएगा ।