हिंदू धर्माच्या जाचक कर्मकांडाना आणि छळाला पर्याय म्हणून गौतम बुद्धांनी जगण्याचं एक नवीन तंत्र सांगितलं, शांती आणि समाधानाने जगण्यासाठी समाजाने पाळायचे नियम सांगितले.. त्याला अनुयायांनी वेगळा “धर्म” केलं..
कर्मकांडापासून सुटण्याची धडपड शेवटी कर्मकांडातच अडकून पडली..
भारतात डॉ.आंबेडकरांनी बौध्द धर्म स्विकारल्यानंतर इतर लोकांनी स्विकारला, ते सर्व हिंदु संस्कारात वाढलेले होते.., त्यामुळे त्यांनी मुळ हिंदु संस्कारासह बौद्ध धर्म स्विकारला.. तो खरा बौद्ध धर्म नव्हताच. त्यामुळे त्यांच्या मध्ये बरेचसे हिंदु संस्कार मिसळले.
आमच्यात बारसं करत नाहीत, पण आम्ही नामकरण करतो..
आमच्यात लग्न नव्हे, तर मंगल परिणय करतात..
आमच्यात वास्तुशांती करीत नाहीत, गृहप्रवेश करतात..
आमच्यात बारावं करीत नाहीत, जलदानविधी करतात..
आम्ही आत्मा मानत नाही, पण फोटोसमोर प्रसाद ठेवतो..
आमच्यात श्राध्द घालत नाहीत, पुण्यानुमोदन करतात..
आमच्यात पुजेवेळी पंचामृत नसतं, पाच फळं असतात..
कलश नसतो, तांब्या असतो..
आंब्याची पानं नसतात, पिंपळाची पानं असतात..
धागा नसतो, सूत असतं..
मंगलाष्टकं नसतात, अष्टमंगलगाथा असते.
आम्ही सत्यनारायण घालत नाही, परित्राण पाठ करतो.
आम्ही कर्मकांडं करत नाही, पुजाविधी करतो.
आम्ही मूर्तीपुजा मानत नाही, पण बुध्दाची मूर्ती पुजतो…
आम्ही अगरबत्या-मेणबत्या लावतो, हाथ जोडतो, मंत्रोपचार केल्याप्रमाणे प्रार्थना म्हणतो, हार घालतो, फुलं वाहतो, एका विशिष्ट( आमच्या ) पध्दतीने प्रणाम करतो. जलप्राशन करतो.
… हा आमचा ‘धर्म’ नाही, ‘धम्म’ आहे..
आम्हाला जगातल्या कुठल्याही धर्मावर बोलायचा अधिकार आहे, पण जी व्यक्ति आमच्या धर्माची नाही, तिला आमच्या धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही..
आम्ही जे काही करतो, ते कसं वैज्ञानिक आहे, हे सांगणारे पुस्तकंच्या पुस्तकं, भाषणंच्या भाषणं भरुन आमच्याकडे स्पष्टीकरण आहे, कारण आमच्याकडे तसं प्रमाणपत्र असल्याने आम्ही विज्ञानवादी असल्याचं गृहितच धरुन चालतो… मग आम्ही (वर्तनाने) बौध्द असलो किंवा नसलो तरीही, आम्ही स्वत:ला विज्ञानवादी मानतो !!
**
गौतम बुध्दांनी ज्या विचारातून बौद्ध धर्म काढला होता तो खूप वेगळा आहे.. कर्मकांडांपासून दूर असणारा, देव आणि मूर्तीपूजा अजिबात न मानणारा बौद्ध धर्म भारतात आता अनुयायांमुळे केवळ मजाक बनून राहिला आहे…
बौद्ध धर्म हा एका विशिष्ट काळात पुरोहित वर्गाला आलेल्या बॅकलॅश च्या पार्श्वभूमीवर आलाय.. तो आजच्या काळात जशाच्या तसा लागू करताच येणार नाही.. तसं अपेक्षितही नाही.. (खरंतर कुठल्याच धर्मात बऱ्याच भौतिक प्रश्नांची उत्तरे नाहीत, पण आपल्या वाटण्यावर जग चालत नाही ना..).. सनातन हिंदू धर्मापेक्षा बौद्धधर्म अगदी थोडासाच् पुरोगामी आहे, इतकाच त्याचा अर्थ आहे…
म्हणून आज थोतांड हिंदू धर्माची एक बकवास उपशाखा याव्यतिरिक्त अधिक ओळख त्याची राहिलेली नाहीये..