सरकारवर टीका आणि तुमचा राग
मी जेव्हा मोदी सरकारवर टीका करतो तेंव्हा काही लोक श्वानासारखे वसकन अंगावर येतात.. बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो पण कधी कधी त्या दुर्लक्षाचा अर्थ ते एकतर आपला नेभळटपणा किंवा त्यांचा विजय वगैरे समजून स्वतःतच खुश होतात.. आणि आजूबाजूचे चार चिअर लिडर्स जमा करून स्युडो आत्मसमाधान मिळवतात.. असो.. मिळवोत बापडे.. अहो, सरकार फक्त एक सेवा पुरवणारी …