Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

बुलशिट..

 

– डॉ सचिन लांडगे.

 

पॅरॅलीसिस पासून कॅन्सर पर्यंत सगळं बरं करणारा सॅबिस्टीन असो, किंवा होली वॉटर पाजणारे पाद्री असो.. बिना ऑपरेशन कॅन्सर निकाल देनेवाले उलेमा सुलेमा असोत किंवा कोणी दळभद्री बाबा बुवा असो.. कोणी का असेना, माझं म्हणणं आहे, यांनी काहीपण गंडे दोरे बांधावे, कसलंही मंतरलेलं पाणी पाजावे, आणखी कोणतीही भिकरचोटगिरी करावी, पण लोकांना मेडिकल ट्रीटमेंट बंद करायला मात्र सांगू नये..

अनेक डॉक्टर पेशंट्सना कळवळून सांगत असतात, तुम्ही काहीही झाडपाला खा, जडिबुटी खा, किंवा तुमचे इतर काहीही प्रयत्न करा.. पण डॉक्टरांना वेळोवेळी दाखवणं, सांगितलेल्या तपासण्या करणं आणि मेडिकल ट्रीटमेंट घेणं बंद करू नका.. पण तरीही लोकं काही सुधरत नाहीत.. कारण या असल्या औषधांमुळे लोक वैद्यकीय ट्रीटमेंट घ्यायचं सोडतात किंवा मेडिकल ट्रीटमेंट चालू करायला उशीर करतात, मग अत्यंत वाईट पद्धतीने कॉम्प्लिकेट होतात.. ह्यांच्या नादी लागून सुरुवातीचा महत्वाचा वेळ घालवल्याने कॅन्सर पुढच्या स्टेज मध्ये जातात.. आणि मग येतात डॉक्टरच्या दारात..

जितकी मार्केटिंग हे लोक स्वतःच्या भोंदूगिरीची करतात किंवा जितकी प्रसिद्धी ते स्वतःच्या तात्पुरत्या रिझल्टस् ला देतात, तितकी प्रसिद्धी त्यांच्या ‘फेल्युअर’ची मात्र होत नाही.. फसलेले लोक ‘आपल्यालाच पथ्यपाणी सांभाळणं झालं नाही’ वगैरे, अशा प्रकारच्या काहीतरी समजूती करून घेऊन गप्प बसतात, आणि नवीन लोक फसतच जातात..

आणि याला हे लोक ‘आयुर्वेदामध्ये सांगितलंय’ अशी पुस्ती जोडतात..
“आयुर्वेदिक आहे” किंवा “शास्रों में लिखा हैं” म्हणलं की सुशिक्षित टाळकी पण लगेच भुलतात..
असे ‘सब घोडे बारा टके’ प्रकारचे उपचार आयुर्वेदात असतात का हो? वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना एकाच रोगासाठी देश, काळ, आहार विहाराचा विचार करून वेगवेगळी औषधे वेगवेगळ्या प्रमाणात द्यावी लागतात की नाही.?

पण आपल्या इथे कोणीही दाढीवाला बाबा किंवा तुपाळ तोंडाची कफनीवाली बाई सरळ टीव्ही वर येउन, ‘इसे सुबह शाम खाने से हृदयरोग, ब्लड प्रेशर जैसी बिमारीया दूर होती है’ असे बडबडत असतात.!! हे असले un-authentic उपाय कोणी घरच्या घरी करीत बसला आणि वैद्यकीय उपचारांना उशीर होऊन एखादा रुग्ण मरण पावला तर जबाबदार कोण ?

एकदा इथे एका महाराजांचे प्रवचन होते, तिथे तंबू लाऊन डायबेटीस, स्थौल्य इ.ची आयुर्वेदिक औषधे विकली जात होती. त्यांच्या प्रमाणीकरणाची (standardization) ग्यारंटी काय ? तिथं शिक्षण, डिग्री, एफडीआय, कायदे काही नाही का लागू होत?!

आयुर्वेद यांच्यामुळे बदनाम होतोय असे वाटत नाही का? एफ.डी.आय. इथे दुर्लक्ष का करते ? यांच्या धार्मिक प्रभावामुळे, कि आयुर्वेदिक औषधे ही ‘औषधे’ नसतात म्हणून? सरकारकडून अपेक्षाच नाही, पण आयुर्वेदिक डॉक्टर्सच्या संघटना याविरुध्द आवाज का उठवत नाहीत तेच कळत नाही.. असो..

फसवणारे भोंदू असतात म्हणून लोक फसतात, आणि फसणारे निर्बुद्ध लोक असतात म्हणून काही जण फसवतात..

आणि अशी ही साध्वी आता संसदेत कायदे बनवायला जाणार आहे म्हणे!! आता करा इथं पण डिफेन्ड.!!
#बुलशीट..

– डॉ सचिन लांडगे.

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *