अख्खी दुनिया चंद्रावर जाईल.. पण हे धार्मिक लोक अजून गुहेतच राहायचा हट्ट धरताहेत..
अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्याला कुराणात दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे.. असं म्हणणं आहे याचं.. मला यांना विचारायचंय,
1. इथे आपण कायदे धर्मग्रंथातले पाळतो की देशातले?
2. शेकडो वर्षांपूर्वीच्या पुस्तकातले रेफरन्सेस आजच्या जगण्यासाठी घ्यायची गरज आहे का?
3. आणि जर त्याच मध्ययुगीन शिक्षा, नियम आणि समजुती तुम्हाला आजही अंमलात आणायच्या असतील, तर मग चोरी करणाऱ्या मुस्लिमांचे हात कापा, बलात्कार करणाऱ्याचे लिंग छाटा, आणि दारू पिणाऱ्या मुस्लिमालाही त्यावेळी जी शिक्षा सांगितलीये तीच द्या.. बघू जमतंय का??
4. संगीत गैरइस्लामी आहे, जीन्स कोकाकोला हे गैर इस्लामी आहेत, कारण ते महंमदाच्या काळात नव्हते.. असं बरळणाऱ्या लोकांच्या घरांना ‘इलेक्ट्रिसिटी’ पण नाही दिली पाहिजे, आणि यांना गाड्यांच्या ऐवजी उंट वापरणे कंपल्सरी केले पाहिजे.. जर तुम्हाला मध्ययुगाचे नियम आताही पाहिजेत, तर सुविधाही तेंव्हाच्याच वापरा ना मग!
आणि, प्रागतिक विचारांवर कधीच एकत्र येणार नाही हे, पण ‘मागे’ जायचे म्हणले की लगेच तिन्ही धर्मांची युती होणार!!